हा लेख ४मे ९५ ला लिहिल्यानंतर दि. ३० सप्टेंबर ९५ पर्यंतच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या या लेखात अं. नि. स. ने नाडी भविष्याबाबत घेतलेला. पवित्रा, याच संदर्भात वर्तमानपत्रांतून आलेले लेख, महाराष्ट्रातील इतर विद्वानांचे विचार व पत्रव्यवहार वाचकांच्या समोर ठेवून. नाडी भविष्याला परस्पर थोतांड ठरविण्याचा घाट अं.नि. स. ने कसा घतला व अंगलट कसा आला याचे साद्यंत विवरण वाचकांना रंजक, विचारवंतांना चिंतन करायला लावणारे व अं.नि.स. च्या विचारांशी जवळीक असणाऱ्यांना अं.नि.स. च्या कार्यातील दांभिकता, उथळपणा व प्रसिद्धीलोलुपतेचे झणझणीत दर्शन घडवणारा असेल.