More Details

महाराजांच्या आखणी प्रमाणे जे सामान ओलेचिंब झाले, नैसर्गिक आपत्ती येऊन बुडाले किंवा चाच्यांच्या तावडीत सापडून गमवावे लागले तरी चालेल

अशा बोजड साधन संपत्तीचे ‘लोढणे’ जमिनीवरून वाहून नेण्यातील गैरसोई आणि धोके लक्षात घेऊन या भागातील मालवाहू जनावरांना रस्ता बदल करून अशा वाटेने ‘दमण’ या त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील बंदरात नेऊन तेथून दाभोळच्या खाडीत आतवर आणायचे असा निर्णय घेणे योग्य आहे असे मिलिट्री कमांडरच्या नजरेतून अभ्यास करत असताना लक्षात येते.

१६६९ साली महाराजांनी एक करार करून मालवाहतुक करायला जहाजे पैसै भरून दमण ते मुंबई बेटापर्यंतच्या सुमारे २०० किमी पट्टीतील समुद्रात पोर्तुगीजांची परवानगी मिळेल अशी सोय केली होती.